Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV9 Marathi

By Devendra Fadnavis on July 24th, 2026
tv9marathi-24-7-2026-2

सर्वांना कल्पना आहे की वारीची परंपरा अत्यंत जुनी, प्राचीन आणि शतकानुशतके अखंडपणे चालत आलेली आहे, महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांतूनही आषाढी आणि कार्तिकी वारीच्या निमित्ताने भागवत धर्माची पताका हाती घेऊन शेकडो, हजारो आणि लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी निघतात, विठुरायाच्या नामाचा गजर करत, माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज तसेच आपल्या संतपरंपरेतील सर्व संतांचे अभंग ओव्या भजने आणि हरिपाठ यांचा अखंड गजर करत ते पंढरीकडे वाटचाल करतात, ही आपल्या सांस्कृतिक वारशाची अमूल्य परंपरा आहे, मोगलांच्या आक्रमणाच्या काळातही वारी थांबली नाही आणि इंग्रजांच्या जुलूमामुळेही ही परंपरा खंडित झाली नाही, अशी ही अखंड वारी आजही अविरत सुरू आहे, या वारीतील वारकरी पाऊस असो किंवा कडक ऊन कोणत्याही परिस्थितीची तमा न बाळगता श्रद्धेने पंढरपूरकडे वाटचाल करत असतात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on July 24, 2026

You may also like

abpmajha-1-7-2026
Posted on July 1, 2026
विधानपरिषद - सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती पदी निवड, मुख्यमंत्री ...

Page 7 of 7